Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय

Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय

सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. खासकरून युवकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमी वयात टक्कल पजत आहे. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती थांबवता येते का? यासाठी काय करावे लागेल याबाबत पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केस गळती कमी कशी करायची?

रामदेव बाबांनी केस गळतीच्या प्रश्नावर बोलताना म्हटले की, केस गळती रोखण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत. यासाठी खास तेल वापरू शकता, यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. तेलाने मालिश केल्यास केस गळती कमी होऊ शकते. तसेच योगासन केल्यावरही केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. तुम्हाला गंभीर शारीरिक समस्या नसेल तर तुम्ही शीर्षासन करू शकता. हे आसन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढते, जेणेकरून केसांची चांगली वाढ होते. याशिवाय तुम्हाला तुमच्या आहारातही बदल करावा लागेल.

आहारात आवळ्याचा समावेश करा

रामदेव बाबांनी सांगितले की, ‘आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, यामुळे केसांची वाढ सुधारते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा रस पिणेही केसांसाठी फायदेशीर आहे. तसेच काळे आणि पांढरे तीळाचे सेवन करावे. यात असलेले मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच जवस खाल्ल्यानेही केसांचे आरोग्य सुधारते.

केस गळण्याची कारणे काय आहेत?

रामदेव बाबांनी सांगितले की, केस गळण्यासाठी खराब आहार आणि खराब जीवनशैली कारणीभूत आहे. काही लोकांचे केस अनुवांशिकतेमुळे देखील केस गळू शकतात. बऱ्याच लोकांचे केस कमी वयात गळतात, त्यामुळे बरेच लोक केसांवर रंग लावतात, त्यातील रसायणांमुळेही केस गळती होऊ शकते. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.

टीप – केस गळती कमी करण्यासाठी कोणताही आयुर्वेदिक उपचार घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू...
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले सत्य