पालघरमध्ये गादी कंपनीला भीषण आग, दोन कामगार गंभीर जखमी

पालघरमध्ये गादी कंपनीला भीषण आग, दोन कामगार गंभीर जखमी

पालघर येथली वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंतायतीजवळ एमआयडीसीतील गादी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन कामगार होरपळले असून त्यांची अवस्था गंभीर आहे. या आगीत 23 कोटींचे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रुप घेतले. कारखान्यात गादी बनवण्यासाठी लागणारा फोम असल्याने मोठा भडका उडाला आहे. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.  अजय रावत (35), राणी रावत (32) अशी जखमींची नावे आहेत. वाड्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कोन येथे भगवान पुष्पदंत इंडस्ट्रीयल प्रा.लिमिटेड या कंपनीत फोमचे उत्पादन केले जाते. सकाळी साडेनऊच्या सुमारास अजय नावाचा कामगार बॉयलरजवळ काम करत असताना अचानक बॉयलरचा स्फोट झााला आणि आग पसरली. बॉयलरजवळ त्या कामगाराची पत्नी राणीही होती. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, या आगीत 23 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीचे मालक भरत जैन यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू...
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले सत्य