नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको

नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको

नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी करत इसळक, निंबळक, खारेकर्जुने गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आज सकाळी निंबळक गावात आणि निंबळक बायपास चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याला ठार मारल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, प्रताप शेळके, अजय लामखडे, जालिंदर कदम, अंकुश शेळके, बी. डी. कोतकर, घनशाम म्हस्के, नाना दिवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. खारेकर्जुने येथील चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी निंबळक येथील एका आठवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेने इसळक, निंबळक, खारेकर्जुने, नवनागापूर, हिंगणगाव, वडगाव गुप्ता परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. या भागातील ग्रामस्थांनी आज सकाळी निंबळक गाव आणि बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाहीत; तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. इसळक, निंबळक गावांतील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत गाव बंद करत दोन्ही गावांतील शाळा बंद ठेवल्या होत्या. पाच वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचा आदेश येईल, असे लेखी निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या...
असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…
सोनभद्रमधील खाणीत मोठी दुर्घटना; दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती
म्यानमारमध्ये सलग दुसऱ्यांदा भुकंप, पुन्हा धक्के बसण्याची शक्यता
बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी
गोदामे खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन; कोळी बांधवांचा केंद्र व राज्य शासनाला इशारा
खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात