बिहारचा विजय आणि उत्तर प्रदेशातील विजय यांची तुलनाच होऊ शकत नाही – अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बिहारच्या विजयाची उत्तर प्रदेशच्या विजयाशी तुलना होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. निवडणुकांमधून विजय आणि पराजयातून आपल्याला धडे मिळतात, असे ते म्हणाले. भाजप आता म्हणू लागले आहेत की, त्यांना महिलांकडून अधिक मते मिळाली. पण १० हजार रुपये किती दिवस देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अखिलेश यादव म्हणाले की, त्यांनी (भाजपने) २०२ जागा जिंकल्या आहेत. आम्हाला हे पचनी पडत नाही. आम्हाला हा निकष ओलांडायचा आहे. बिहारचा विजय उत्तर प्रदेशच्या विजयाशी जुळू शकत नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. उत्तर प्रदेशसाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विधानामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: On the results of the #BiharElections, Samajwadi Party chief Akhilesh Yadav says, “Elections teach us lessons from wins and losses. The BJP has started saying that they received more votes from women. How long will you give Rs 10000? When will you… pic.twitter.com/No3Yzqb12O
— ANI (@ANI) November 15, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List