मुंबई महापालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी, साडेआठ कोटी रुपयांची विशेष तरतूद

मुंबई महापालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी, साडेआठ कोटी रुपयांची विशेष तरतूद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता असली तरी मुंबई महानगरपालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी सुरूच आहे. विविध विकासकामांसाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने दिला आहे. या निधीतून विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.

राज्यातल्या नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी सध्या आचारसंहिता लागू आहे. अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यास अद्याप कालावधी आहे, पण त्यापूर्वीच मुंबईत मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या नावाखाली साडेआठ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने दिला आहे.

निवडणुकांवर डोळा

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवत महायुती सरकारने विविध नगर परिषदा व नगर पंचायतींवर निधीची खैरात केली आहे. या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी नगरविकास विभाग व नियोजन विभागाने तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिकचा निधी व कामे मंजूर केली आहेत. वैशिष्टय़पूर्ण योजना, रस्ते, बांधणी, खेळाची मैदाने, खुले सभागृह अशा विविध कामांसाठी 1 हजार 222 कोटी 97 लाख रुपयांचा निधी दिली आहे. हा निधी देताना विरोधकांच्या मतदारसंघांना डावलून सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्र्यांच्या जिह्यांवर निधीची खैरात होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या...
असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…
सोनभद्रमधील खाणीत मोठी दुर्घटना; दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती
म्यानमारमध्ये सलग दुसऱ्यांदा भुकंप, पुन्हा धक्के बसण्याची शक्यता
बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी
गोदामे खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन; कोळी बांधवांचा केंद्र व राज्य शासनाला इशारा
खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात