थंडीच्या कडाक्यात वाढले त्वचा विकार

थंडीच्या कडाक्यात वाढले त्वचा विकार

>> राजाराम पवार

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी आणि तंदुरुस्त राहणे थोडे आव्हानात्मक असते. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांबरोबरच थंड हवा आणि घरातील ऊबदार हवेत अचानक बदल होत असल्याने त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे, खाज सुटणे, त्वचा लालसर होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात व यामुळे चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी आपल्या त्वचेचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात थंडीचा प्रभाव वाढल्याने सध्या नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासह त्वचेचे गंभीर आजार उद्भवत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेतील स्निग्धता कमी झालेली असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंघोळ करताना साबणाचा वापर केल्याने त्वचा अधिकच कोरडी पडून तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे खाज सुटते, जखमा होतात आणि त्यातून इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. धूळ आणि मातीच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होत आहेत. यात त्वचा सुरकुतने, खवले पडणे, कोरडे चट्टे उठणे, ओठ फाटणे, यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

थंडीत त्वचा कोरडी पडू नये, यासाठी अशी घ्या काळजी

थंडीच्या काळात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नये, हलक्या कोमट पाण्याने करावी. आंघोळीनंतर मॉश्चरायजर्स लावावे, ज्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही, ज्येष्ठ नागरिकांनी त्वचेचे विकार टाळण्यासाठी आंघोळ करण्यापूर्वी शरीराला खोबरेल तेल लावावे, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, पालेभाज्या, कडधान्य यांचा वापर करावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

अचानक थंडीचा कडाका वाढल्याने सध्या त्वचेचे विकार उद्भवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्वचा कोरडी पडणे, इन्फेक्शन होणे, ओठ फाटणे, टाचांना भेगा पडणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेचे गंभीर आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

डॉ. विद्याधर सरदेसाई, त्वरोग तज्ज्ञ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या...
असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…
सोनभद्रमधील खाणीत मोठी दुर्घटना; दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती
म्यानमारमध्ये सलग दुसऱ्यांदा भुकंप, पुन्हा धक्के बसण्याची शक्यता
बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी
गोदामे खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन; कोळी बांधवांचा केंद्र व राज्य शासनाला इशारा
खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात