मतचोरीतही हिंदू, मुस्लिम दिसतात…  भाजपच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते

मतचोरीतही हिंदू, मुस्लिम दिसतात…  भाजपच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते

राज्य व केंद्रातील भाजपचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे; परंतु भाजपला यातही हिंदू-मुस्लिमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

भाजपचे नेते आणि मंत्री आशीष शेलार यांनी विरोधकांच्या मतदारसंघात मुस्लिमांची दुबार नावे असून त्याबाबत विरोधक बोलत नाहीत. त्यांना केवळ हिंदूंची दुबार नावे दिसतात, असा आरोप केला होता. या टीकेला सकपाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एसआयटीत न्यायमूर्तींचा सहभाग हवा

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यावेळी म्हणाले की, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करावी. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला डॉक्टरने रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारने याप्रकरणी न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन केली नाही तर 10 नोव्हेंबरला वर्षा बंगल्याला घेराव घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही...
तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली…, बंगळुरुच्या त्या डॉक्टरने प्रेयसीला मेसेज करत दिला कबुलीजबाब
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल
ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा