कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी

कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी

गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार चिपळूण तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली असून भातशेती आणि नाचणीची पीकं पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे, असे चिपळूण विधानसभा मतदालसंघाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी सांगितले की, गावोगावी पंचनामे करताना प्रत्येक गावाला एक अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी नियुक्त करावा, जेणेकरून पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल. यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांनी चिपळूण शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट, उक्ताड, खेंड परिसर, मतेवाडी शेतकरी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Kidney आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्तच शुद्ध करण्याचे काम करत नाही तर शरीरातील विषारी घटकही...
40 नंतर त्वचेची निगा राखण्यासाठी ‘हे’ दोन व्हिटॅमिन्स ठरतील फायदेशीर….
आतड्यांमधील घाण कशी काढायची? सद्गुरूंनी सांगितले 3 सर्वात प्रभावी मार्ग
बदलत्या ऋतूमध्ये कानाचं इंफेक्शन होऊ नये म्हणून नेमकं काय करावे?
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले
विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही ICC वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
संगमनेरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशाची तस्करी, कारवाईत 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त