मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण, पाच महिन्यांनी दोन रेल्वे इंजिनीयर्सवर गुन्हा

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण, पाच महिन्यांनी दोन रेल्वे इंजिनीयर्सवर गुन्हा

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोन इंजिनीयर्सवर गुन्हा दाखल केला आहे. तपासणी, पडताळणी व पाच महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दोन इंजिनीयर्सच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट होताच जीआरपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत.

9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला. दोन धावत्या लोकलमधील 13 प्रवासी एकमेकांना आदळून खाली कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तर 9 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करत तपासाला सुरुवात केली होती. जीआरपीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत पाच महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासादरम्यान मुख्य अभियांत्रिकी आणि देखभालीच्या दुरुस्तीमधील चुकांचा आढावा घेण्यात आला. त्यात या दोन इंजिनीयर्सचा निष्काळजीपणा आढळून आल्याने ठाणे जीआरपीने शनिवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Kidney आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्तच शुद्ध करण्याचे काम करत नाही तर शरीरातील विषारी घटकही...
40 नंतर त्वचेची निगा राखण्यासाठी ‘हे’ दोन व्हिटॅमिन्स ठरतील फायदेशीर….
आतड्यांमधील घाण कशी काढायची? सद्गुरूंनी सांगितले 3 सर्वात प्रभावी मार्ग
बदलत्या ऋतूमध्ये कानाचं इंफेक्शन होऊ नये म्हणून नेमकं काय करावे?
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले
विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही ICC वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
संगमनेरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशाची तस्करी, कारवाईत 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त