मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल

भाजपचे नेते व मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मनसेसह विरोधकांवर टीका करत मुस्लीम दुबार मतदारांबाबत प्रश्न उभे केले होते. यावरून नकळत आशीष शेलार यांनी दुबार मतदार असल्याचे मान्य केले असल्याची टीकाही विरोधकांनी केली. दरम्यान आज म्हणजेच मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत असून यात जिल्हा व मनपा निवडणूकांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेबाबत ट्विट करत भाजप व आशिष शेलार यांना काही प्रश्न केले आहेत. ”प्रश्नपत्रिकेत घोळ असेल तर परीक्षा घेणे योग्य आहे का ? प्रश्नपत्रिका बदलायची की नाही ? काल पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांचा घोळ असल्याचा आरोप करणारी भाजपा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का ? मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेण्याची भूमिका बोलघेवड्या भाजपला मान्य आहे का ? किमान आशिष शेलार साहेबांनी तरी भूमिका घ्यावी? असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Kidney आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्तच शुद्ध करण्याचे काम करत नाही तर शरीरातील विषारी घटकही...
40 नंतर त्वचेची निगा राखण्यासाठी ‘हे’ दोन व्हिटॅमिन्स ठरतील फायदेशीर….
आतड्यांमधील घाण कशी काढायची? सद्गुरूंनी सांगितले 3 सर्वात प्रभावी मार्ग
बदलत्या ऋतूमध्ये कानाचं इंफेक्शन होऊ नये म्हणून नेमकं काय करावे?
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले
विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही ICC वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
संगमनेरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशाची तस्करी, कारवाईत 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त