मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
          मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली. मणिपुरमध्ये बंदी घातलेल्या संघटनेशी यूनाइटेड कूकी नेशनल आर्मी जोडलेले होते. शांतीच्या करारावर यूनाइटेड कूकी नॅशनलने सह्या केल्या नव्हत्या. आता पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.
सुरक्षा रक्षकांना खानपी गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यामध्ये सुरक्षारक्षक आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली यात चार अतिरेकींचा खात्मा करण्यात आला. मणिपुरमध्ये शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक कूकी आणि जोमी अतिरेकी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत समझोता करार केला होता. मात्र करार केलेल्या संघटनांच्या यादीत यूनाइटेड कूकी नेशनल आर्मी चा समावेश नव्हता.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षक आणि अतिरेक्यामध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला तर अनेकजण जखमी झाले. तर अनेकजण बचाव करुन पळण्यात यशस्वी झाले. तिथून पळालेल्या अतिरेक्यांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List