एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र, तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप

एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र, तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांचे विशेष पुर्ननिरीक्षण (एसआयआर) केले जात आहे. या एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप तामीळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला आहे. 40 प्रादेशिक व काही राष्ट्रीय पक्षांच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

स्टॅलिन म्हणाले, अशाप्रकारे मतदारांचे विशेष पुननिरीक्षण (एसआयआर) बिहार राज्यात करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मताच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मताचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु या आत्म्यालाच नख लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आम्ही सुधारणांच्या विरोधात नाही, मात्र एसआयआरच्या माध्यमातून मताच्या अधिकारापासून वंचित केले जात आहे. एसआयआर तामिळनाडूसहित अन्य राज्यांमध्येही केले जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

द्रविड कळघमचे अध्यक्ष के. किरमणी म्हणाले, एसआयआर प्रक्रियेला कुठल्याही प्रकारे कायदेशीर आधार नाही. तर एसआयआर करण्यासंदर्भात संविधानात तरतूद नाही. तर अन्य पक्षाच्या नेत्यांनीही एसआयरबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरले.

… तर दुसऱ्या राज्यातील मतदार मतदान करतील – वायको

मतदारांचे केले जाणारे पुननिरीक्षण मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव आहे. एसआयआरला अनुमती दिल्यास दुसऱ्या राज्यातील 75 लाखांपेक्षा जास्त मतदार तामिळनाडूच्या निवडणुकीत मतदान करतील, असा इशारा एमडीएमकेचे महासचिव वायको यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही...
तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली…, बंगळुरुच्या त्या डॉक्टरने प्रेयसीला मेसेज करत दिला कबुलीजबाब
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल
ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा