शिवसेना आजही तेवढय़ाच ताकदीने उभी आहे!

शिवसेना आजही तेवढय़ाच ताकदीने उभी आहे!

राजन धुरी यांच्यासह पालघर जिह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन केले. ‘शिवसेना संपली असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शिवसेना कधीच संपू शकत नाही. शिवसेना आजही तेवढयाच ताकदीने उभी आहे. आठवडय़ातून दोन-चार वेळा शिवसेनेत प्रवेश होत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘अमित शहा आणि कंपनीला वाटले होते की शिवसेना संपली. पण परिस्थिती अशी आहे की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांच्या गळ्याखाली घास उतरत नाही. आपली ताकद त्यांना त्रासदायक ठरते आहे. महाराष्ट्र गिळण्यासाठी त्यांना शिवसेना संपवायची आहे. तो गिळू न देणारी शिवसेना त्यांना नको आहे. विधानसभेत अनपेक्षित निकाल लागला, पण आता त्यांचे मतचोरीचे बिंग फुटले आहे. त्यामुळे आता मतदार यादीवर काम करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

राजन धुरी यांच्यासह पालघर जिह्यातील वाडा तालुका व भिवंडी ग्रामीण विधानसभेतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ’मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, ऍड. अनिल परब, उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, विश्वास थळे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही...
तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली…, बंगळुरुच्या त्या डॉक्टरने प्रेयसीला मेसेज करत दिला कबुलीजबाब
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल
ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा