अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक, नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी

अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक, नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडला आहे. नऊ सदस्यांचे हे पथक आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता आहे.

सोमवारी हे पथक मुंबईत दाखल झाले असून दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. या पथकाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशीही बैठकीत चर्चा केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत, तर नागरी भागाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तर केंद्र सरकारने 1566.40 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही केंद्रीय पथकाने अद्याप पाहणी केली नाही.

सोमवारी हे पथक मुंबईत दाखल झाले. केंद्रीय आंतरिक सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यांचे पथकाने मुंबईत बैठका घेतल्या. या पथकात कृषी विभागाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे,  वित्त विभागाचे उपसचिव कंदर्प पटेल, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग, रस्ते आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव अभिषेक राज, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सारेन, इस्रोचे संचालक डॉ. एसव्हीएसपी शर्मा, गृह मंत्रालयातील उपायुक्त आशीष गौर यांचा समावेश आहे.

या पथकाने दिवसभर मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. तसेच हे पथक रात्री उशिरा कोणत्या भागाचा दौरा करणार आहे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही...
तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली…, बंगळुरुच्या त्या डॉक्टरने प्रेयसीला मेसेज करत दिला कबुलीजबाब
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल
ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा