शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर आसुड

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर आसुड

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अभ्यास सुरू आहे असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज आसुड ओढला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. बामण मिळत नसेल तर यूपीमधून आणून देतो, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करा, अशी मागणीही त्यांनी केली.

सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शेतकऱ्यांचा ‘आसुड मेळावा’ घेण्यात आला होता. त्यात बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, अभ्यास सुरू आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चार-चार पुस्तकेच पाठवून देऊ. आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही, एवढे लबाड देवाभाऊ बोलतात. सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे सांगतात. आता मोदींना कधी जाग यायची आणि कधी सोयाबीन खरेदी व्हायची, असे बच्चू कडू म्हणाले.

शेतकऱ्याच्या कापसाला किंमत नाही, पण कापसापासून बनणाऱ्या झेंड्याच्या रंगाला किंमत आहे, अशी खंतही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली. एक लाख कोटी बजेट असणाऱ्या मुंबईला राज्य सरकारच्या बजेटमधून 65 हजार कोटी रुपये देतात, मात्र उर्वरित राज्याला त्यापेक्षा कमी मिळते. हे अर्थकारण का? असा सवालही त्यांनी केला.

56 इंच छातीवाले मोदी ट्रम्पला घाबरतात

बच्चू कडू यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. 56 इंच वाले मोदी ट्रम्पला घाबरतात आणि तिथे त्याच्यापुढे नमाज पडतात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी जात-धर्म-पक्ष सोडून एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे आवाहनही केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनावश्यक गाळ्यांसाठी शेतकऱ्यांचा लाखोंचा भाजीपाला चार दिवस कुजवला, कोल्हापूर बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह अनावश्यक गाळ्यांसाठी शेतकऱ्यांचा लाखोंचा भाजीपाला चार दिवस कुजवला, कोल्हापूर बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱया शेतकऱ्यांना दररोज वाहतूककोंडीचा त्रास होत असतानाच, आता नेहमी भाजी उतरवून घेण्याच्या रस्त्यावरच गाळे...
महापालिका निवडणूकीसाठी सांगलीत मतदार यादी अंतिम करण्याचे काम वेगाने सुरू!
महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी खेळाडूंना दोष देण्याची प्रवृत्ती निंदनीय; मंत्र्यांचे विधान लाजिरवाणं, आदित्य ठाकरेंचा घणाघात
देश विदेश – अ‍ॅपलने दोन डेटिंग अ‍ॅप हटवले
22 बोगस विद्यापीठे, यूजीसीने जाहीर केली नावे; दिल्ली आघाडीवर
रायगडावर इलेक्ट्रिक वाहने वापराविना उघड्यावरच पडून; मंत्र्यांसाठी उधळपट्टी, प्रशासनाचा बेफिकीरपणा
बेरोजगारी, व्यसन आणि नैराश्य ठरतेय जीवघेणे;  2023 मध्ये देशात सुमारे सात लाख, तर महाराष्ट्रात 22 हजार आत्महत्या,  एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी