रायगडावर इलेक्ट्रिक वाहने वापराविना उघड्यावरच पडून; मंत्र्यांसाठी उधळपट्टी, प्रशासनाचा बेफिकीरपणा

रायगडावर इलेक्ट्रिक वाहने वापराविना उघड्यावरच पडून; मंत्र्यांसाठी उधळपट्टी, प्रशासनाचा बेफिकीरपणा

>> शीतल धनवडे

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, अशी आपल्या प्रशासनाला सक्त सूचना देऊन रयतेची काळजी घेणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पण स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मंत्र्यांसाठी आणलेली दोन इलेक्ट्रिक वाहने गेल्या सहा महिन्यांपासून वापराविना पडून आहेत. ऊन, वारा आणि पावसात उघडय़ावरच असलेल्या या वाहनांची अवस्था पाहता, मंत्र्यांसाठी नाहक लाखो रुपयांची केलेली ही उधळपट्टी आणि प्रशासनाचा बेफिकीरपणा पाहता गडावर येणाऱया शिवभक्तांसह पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही वाहने अशीच पडून वाया जाण्यापेक्षा गडावर येणाऱया पर्यटकांसाठी त्याचा वापर व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड हा आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याने नेहमी शिवभक्तांसह पर्यटकांनी गजबजलेला असतो. सध्या दिवाळीच्या सुट्टीमुळे गडावर दररोज आबालवृद्धांसह हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. पायी चालण्यासह गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था आहे.रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गडावर विविध कामे सुरू आहेत. पुरातत्व विभागाकडून ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडावरील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली होती. गोल्फ खेळांमध्ये वापरण्यात येणाऱया वाहनांप्रमाणे लाखो रुपये खर्चून दोन इलेक्ट्रिक वाहने गडावर नेण्यात आली. अवघ्या काही मिनिटांसाठी आणलेली ही वाहने होळीच्या माळावरून बाजारपेठेकडे जाताना, लगतच तशीच उघडय़ावर ठेवण्यात आली आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ उैन, वारा, पावसाचा मारा झेलत ही वाहने उघडय़ावर तशीच पडून राहिल्याने ती अक्षरशः सडून जात आहेत. याची स्थानिक जिल्हा प्रशासनासह कोणाला कसलीच फिकीर नसल्याचे दिसून येत आहे. वापराविना तशीच ही वाहने पडून राहण्यापेक्षा गडावर येणाऱया आबालवृद्ध शिवभक्त पर्यटकांसाठी तरी सशुल्क वापरण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची शिफारस केली आहे. तसे शिफारस पत्र सरन्यायधीशांनी कायदा मंत्रालयाकडे...
ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 
हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम घरात मृतावस्थेत आढळली, क्रीडा विश्वात खळबळ
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी वडिलांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, तीन दिवस सुरू होते अघोरी प्रकार
चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल
मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत