रेल्वे स्थानकावर झळकले ‘छत्रपती संभाजीनगर’

रेल्वे स्थानकावर झळकले ‘छत्रपती संभाजीनगर’

‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर होऊनही रेल्वे स्थानकाचे नाव जुनेच ठेवले होते. ते तातडीने बदलण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रेल्वे स्थानकाच्या नामफलकावर ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नवीन नाव झळकले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या फलकांवरील जुने नाव पुसून टाकण्यात आले आहे.

‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ जिह्यांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या निर्णयाला आधी मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते. दोन्ही ठिकाणी याचिका फेटाळण्यात आल्यानंतर नामांतर मार्गी लागले होते. त्यानंतरही रेल्वे स्थानकाचा फलक मात्र बदलला नव्हता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनावश्यक गाळ्यांसाठी शेतकऱ्यांचा लाखोंचा भाजीपाला चार दिवस कुजवला, कोल्हापूर बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह अनावश्यक गाळ्यांसाठी शेतकऱ्यांचा लाखोंचा भाजीपाला चार दिवस कुजवला, कोल्हापूर बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱया शेतकऱ्यांना दररोज वाहतूककोंडीचा त्रास होत असतानाच, आता नेहमी भाजी उतरवून घेण्याच्या रस्त्यावरच गाळे...
महापालिका निवडणूकीसाठी सांगलीत मतदार यादी अंतिम करण्याचे काम वेगाने सुरू!
महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी खेळाडूंना दोष देण्याची प्रवृत्ती निंदनीय; मंत्र्यांचे विधान लाजिरवाणं, आदित्य ठाकरेंचा घणाघात
देश विदेश – अ‍ॅपलने दोन डेटिंग अ‍ॅप हटवले
22 बोगस विद्यापीठे, यूजीसीने जाहीर केली नावे; दिल्ली आघाडीवर
रायगडावर इलेक्ट्रिक वाहने वापराविना उघड्यावरच पडून; मंत्र्यांसाठी उधळपट्टी, प्रशासनाचा बेफिकीरपणा
बेरोजगारी, व्यसन आणि नैराश्य ठरतेय जीवघेणे;  2023 मध्ये देशात सुमारे सात लाख, तर महाराष्ट्रात 22 हजार आत्महत्या,  एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी