Jalna News – वाढोणा तांडा येथील शाळकरी मुलांचा तलावात बुडून मुत्यू, गावावर शोककळा

Jalna News – वाढोणा तांडा येथील शाळकरी मुलांचा तलावात बुडून मुत्यू, गावावर शोककळा

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथील दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम गणेश आढे (11) आणि कुणाल कृष्णा आढे (13) आज (14 ऑक्टोबर 2025) पेपर संपवून घरी आले होते. शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे दोघेही खूश होते. त्यामुळे घरी आल्यावर दोघेही गावा शेजारी असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही देऊळगाव राजा येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये शिकत होते. यामध्ये ओम आढे पाचवीला तर कुणाल आढे सातवीला होता. सदरील मुले पाण्यात बुडाल्यानंतर तलावाच्या काठावर उभे असलेल्या दुसर्‍या मुलांनी आरडाओरडा केला. परंतु सर्व शेतीच्या कामात व्यस्त असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही. शेवटी या चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. सदरील दोघा मृतांना टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणीअंती मृत घोषित केले व दोघांवर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का? Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का?
आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जग एका मोबाईलमध्ये सामावले आहे. इंटरनेट, मोबाईलमुळे जगणं सोपं...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म
वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक