मध्य प्रदेशात विचित्र तापाची साथ; 2 महिन्यात सहा मुलांचा मृत्यू, आजाराचे निदान होत नसल्याने प्रशासन चिंतेत

मध्य प्रदेशात विचित्र तापाची साथ; 2 महिन्यात सहा मुलांचा मृत्यू, आजाराचे निदान होत नसल्याने प्रशासन चिंतेत

आत्तापर्यंत आपण अनेक आजारांची नावे ऐकली असतील. यापैकी काही आजार गंभीर असतात ज्यावर उपचार करूनही ते बरे होत नाहीत. तर काही आजार हे लवकर बरे होणारे असतात. मात्र काही आजारांवर लवकर इलाज झाला नाही तर जीवावर बेतण्याची शक्यता असते. दरम्यान काही आजार असे असतात जे झाले तरी त्यांचे निदान डॉक्टरांनाही लागत नाही. असाच एका आजाराने सध्या मध्यप्रदेशात धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

छिंदवाडा जिल्ह्यातील गावांमध्ये गेल्या काही आठवड्यात मुलांमध्ये गंभीर आजारांच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या विषाणूजन्य तापामुळे आतापर्यंत सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये किडनी फेल होणे हे प्रमुख कारण होते. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दक्षता घेतली असून त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. नरेश गोन्नाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे विषाणूजन्य तापाचे रुग्ण वाढले. त्यामुळे मुलांना परसिया येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. 4 सप्टेंबर रोजी परसियाहून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर केलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी किडनी फेल झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांतच ६ सप्टेंबरपर्यंत आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. आता 26 सप्टेंबरपर्यंत एकूण मृतांची संख्या सहावर पोहोचली. सर्व प्रकरणांमध्ये मूत्रपिंडांशी निगडीत असणारी समान लक्षणे दिसून आली. त्यामुळे आता आरोग्य विभागाने 500 हून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने, यकृत आणि मूत्रपिंडाच्या चाचण्यांसह चाचण्या केल्या आहेत. परंतु अद्याप कोणत्याही विशिष्ट आजाराची पुष्टी झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
हात धुणे एक आवश्यक सवय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला वाचता येते. आपण जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरुन आल्यानंतर कोणाला स्पर्श केल्यानंतर...
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक
अमेरिकेला लढायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढू, १०० टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीनचा इशारा
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना