अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक अटी शर्ती व निकष लागू केले आहेत. एकीकडे सरकारकडून सरसकट 50 हजारांची कर्जमाफी देण्यात आलेली नाही तसेच सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना अत्यंत तुटपूंजी मदत मिळणार आहे. त्यातही सरकारने लागू केलेल्या अटी शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कळंबचे खासदार कैलास पाटील यांनी X वरून पोस्ट शेअर करत फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

”शेतकऱ्यांना भरीव मदत मिळू देतील ते फडणवीस सरकार कसले. अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार अगोदर पासूनच माहिर आहे, कर्जमाफीच्या वेळीही शेतकऱ्यांना असच फसवून टाकलं, आता नुकसान भरपाईवर नियमांच बोट दाखवतंय. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेती उद्ध्वस्त झाली, विहिरी बुजल्या गेल्या, बांध तुटले आणि या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याला उभं करण्याऐवजी, फडणवीस सरकारने मदतीच्या नावाखाली अटींचं ओझं वाढवलं आहे. विहिरी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त ३० हजार रुपयांची तुटपुंजी मदत घोषित करण्यात आली आहे. त्यातही ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक काढून सरकारने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. तस पाहिल तर शेतकऱ्यांना एक फूट गाळ काढण्यासाठी कमीत कमी १० हजारांचा खर्च येतो आणि सरकार फक्त ३० हजार देऊन “मोठी मदत केली” असा दावा करत आहे, पण प्रत्यक्षात मदत मिळू नये म्हणून कडक नियमांचे जाळे टाकत आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सरकार कृषी सहाय्यक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरीची स्थळ पाहणी करून अंदाजपत्रक तयार करायला सांगत आहे, मग त्या सक्षम अधिकाऱ्यांनी केलेल्या स्थळ पाहणीलाच पंचनामे म्हणून ग्राह्य का धरत नाही? स्थळ पाहणी कशासाठी? शेतकऱ्यांच्या वेदनेचा पुरावा दडपण्यासाठी का? सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीसाठी अटी घालणं थांबवावं, विहिरीच्या भरपाईसाठी सातबारा नोंदीची अट तात्काळ रद्द करून प्रत्येक शेतकऱ्याला मदत द्यावी, मग ती नोंद असो वा नसो, अशी पोस्ट शेअर करत कैलास पाटील यांनी सरकारला फटकारले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण
माओवादी- नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ...
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन; वाचा काय आहेत मुद्दे…
उद्धव ठाकरेंकडून चोकलिंगम यांना निवेदन; बैठकीत काही मुद्दे अनिर्णित, सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पुन्हा भेटणार; संजय राऊत यांची माहिती
मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका
Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके; चांदीच्या दरात एका दिवसात 10 हजाराची वाढ
पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.