राजावाडीच्या महिला सुरक्षा रक्षकांवर गर्दुल्ल्यांनी केला हल्ला

राजावाडीच्या महिला सुरक्षा रक्षकांवर गर्दुल्ल्यांनी केला हल्ला

घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट आहे. या गर्दुल्ल्यांकडून अनेकदा डॉक्टरांना आणि कर्मचाऱयांना धमकावण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तरी परिस्थिती जैसे थे आहे. गुरुवार दुपारच्या सुमारास अपघात विभागाच्या समोर तैनात असलेल्या दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेचा शिवसेनेच्या शिव आरोग्य सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करून शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक 11 ते 13 सप्टेंबर असे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली....
कुख्यात बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधींचे घबाड, खुनाच्या गुह्याचा तपास गुन्हे शाखेकडे
जीएसटी कमी करूनही दूध स्वस्त होणार नाही, आधीच कर शून्य असल्याचा कंपन्यांचा दावा
‘टीईटी’संबंधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिक्षक चिंताग्रस्त, परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या सक्तीमधून सूट देण्याची मागणी
रमेश गायचोरच्या जामीनप्रकरणी अधीक्षकांचा माफीनामा, न्यायालयाच्या दणक्यानंतर तुरुंग प्रशासन वठणीवर
मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचे पंख कापले; सहपालकमंत्र्यांना तक्रारी सोडवण्याचे अधिकार, अठरा महिन्यानंतर सोपवली जबाबदारी
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार