नेपाळमध्ये Gen-Z गटात फूट; बैठकीत अयोग्य लोकांना बोलवण्यात आल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप

नेपाळमध्ये Gen-Z गटात फूट; बैठकीत अयोग्य लोकांना बोलवण्यात आल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप

नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतरही तेथे तणाव कायम आहे. Gen-Z आणि सैन्य यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर कार्की आणि प्रसाई लष्कराच्या नेतृत्वाला भेटण्याची शक्यता आहे. नेपाळमधील सध्याची राजकीय पेच सोडवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, आता आंदोलन करणाऱ्या Gen-Z मध्येच फूट पडल्याचे दिसत आहे. बैठकीत चुकीच्या लोकांना बोलावण्यात आले होते, असा आरोप लष्कर मुख्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या तरुणांनी केला आहे.

नेपाळमधील नवीन सरकारबाबत लष्कराच्या मुख्यालयात महत्त्वाच्या चर्चा सुरू आहेत. यावेळी लष्कर आणि Gen-Z प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. Gen-Z मधील सात लोक लष्कराच्या मुख्यालयात उपस्थित आहेत. दरम्यान, लष्कर मुख्यालयाबाहेर निदर्शने करणारऱ्या Gen-Z तरुणांनी बैठकीला उपस्थित असलेल्यांवर टीका करत बैठकीसाठी अयोग्य लोकांना बोलवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

तरुणांनी लष्कर मुख्यालयात होणाऱ्या चर्चेला विरोध केला आणि म्हटले की बैठकीत चुकीच्या लोकांना बोलावले जात आहे. त्यांनी मागणी केली की ही चर्चा राष्ट्रपती भवनात व्हावी आणि त्याची माहिती सार्वजनिक करावी. Gen-Z आणि लष्कर यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी सध्या लष्कर मुख्यालयात सुरू आहे. या बैठकीत सात सदस्य उपस्थित आहेत. यानंतर, सुशीला कार्की आणि दुर्गा प्रसाई लष्करप्रमुखांना भेटतील. ही बैठक दुपारी 4 वाजता होण्याची अपेक्षा आहे.

लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनीही राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे आणि त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी राष्ट्रपतींना सांगितले की, लष्कर राजकीय आणि संवैधानिक तोडगा काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेच्या दिशेने लष्कर आणि Gen-Z यांच्यातील ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. लष्कराचे नेतृत्व सर्व पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून शक्य तितक्या लवकर संवैधानिक तोडगा काढला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा