Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा

Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा

खंडाळा येथील सायली देशी बारचालक दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरू आहे. दुर्वास पाटीलने दिलेली माहिती खरी आहे का हे तपासात उघड होणार आहे. सीताराम वीरकडे भक्ती मयेकरचा मोबाईल नंबर कसा आला? विश्वास पवार दुर्वास पाटीलने केलेल्या प्रत्येक हत्येत का सहभागी होत होता? या सर्व गोष्टी तपासात उघड होणार आहेत. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी केलेल्या तपासाची चौकशी होणार असून जयगड पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

राकेश जंगम याची हत्या करून दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांनी आंबा घाटातील दरीत टाकला होता. पोलिसांना राकेश जंगमचा मृतदेह सापडला नाही. मृतदेह एक वर्षापूर्वी टाकल्याने त्याचे अवशेषही सापडले नाहीत. तसेच त्या परिसरात पावसामुळे घनदाट झाडी वाढली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

हत्याकांड उघडकीस आल्यानंतर दुर्वास पाटील याचा खंडाळ्यातील सायली बार पहिल्या दिवशी बंद करण्यात आला होता. मात्र तो देशी बार पुन्हा सुरु झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र सायली देशी दारू बार बंद करण्याबाबत अहवाल पाठवल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी? खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळेच तरुणांपासून ते...
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक