शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, त्रिची विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा
तांत्रिक बिघाडामुळे शारजाहला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान त्रिची विमानतळावरच थांबविण्यात आले. यामुळे 176 प्रवासी काही तास विमानातच अडकून पडले होते. प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली. काही तासांनी पर्यायी विमानाची सोय करत प्रवाशांना शारजाहला रवाना करण्यात आले.
तामिळनाडूतील त्रिची विमानतळावरून बुधवारी पहाटे 4.45 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान शारजाहसाठी उड्डाण घेणार होते. मात्र तत्पूर्वीच विमानात काही तांत्रिक बिघाड आढळून आले. यामुळे विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. विमानात 176 प्रवासी होते. सुरक्षा नियमांनुसार प्रवाशांना काही वेळ विमानातच थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप विमानातून उतरवून टर्मिनलवर आणण्यात आले. दुपारी 2.30 वाजता पर्यायी विमानाने प्रवाशांना पाठवण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List