नागपुरात निराश कंत्राटदारानं संपवलं जीवन, मात्र सरकारचं याकडं दुर्लक्ष; रोहित पवार यांची टीका

नागपुरात निराश कंत्राटदारानं संपवलं जीवन, मात्र सरकारचं याकडं दुर्लक्ष; रोहित पवार यांची टीका

राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची बिले थकवून ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये नैराश्य पसरले असून काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतामध्येच गळफास घेऊन जीवन संपवलं. याचाच काहीच दिवसांत या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नागपूरमध्ये पी. व्ही. वर्मा या कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

X वर एक पसोट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “राज्यात शेतकरी आत्महत्या, मालाला हमीभाव, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, कंत्राटदारांची थकीत बिलं, महिलांची सुरक्षा, हे ज्वलंत आणि जातीधर्माच्या पलीकडचे प्रश्न असताना सरकारचं नेमकं याकडंच दुर्लक्ष होतंय. थकीत बिल मिळत नसल्याने सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली. तरी हे सरकार जागं झालं नाही आणि आता पुन्हा थकबाकीमुळंच अडचणीत आलेल्या नागपूरमधील पी. व्ही. वर्मा या दुसऱ्या कंत्राटदाराने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. आपापसातच एकमेकांना दाबण्यासाठी राजकीय डावपेचात गुंतलेल्या या सरकारला सामान्य माणसाच्या या प्रश्नांकडं बघायला वेळ मिळणार आहे की नाही?”

ते पुढे म्हणाले आहेत की, “सरकारने किमान जबाबदारीचं तरी भान ठेवावं. पण हे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चाणक्य नितीची नाही तर माणुसकी नितीची गरज आहे, ती पुढच्या काळात तरी दिसेल का?”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी? खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळेच तरुणांपासून ते...
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक