मिंधेंच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल! पाणी तुंबले, रस्त्यावर खड्डे, मंत्र्यांचे फक्त फोटोसेशन; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मिंधेंच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल! पाणी तुंबले, रस्त्यावर खड्डे, मंत्र्यांचे फक्त फोटोसेशन; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झाले नाहीत. असे असताना मंत्री महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन फक्त फोटोसेशन करीत असल्याचा घणाघात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. तत्कालीन फेकनाथ मिंधे यांच्या कार्यकाळात झालेल्या पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल होत असल्याचेही ते म्हणाले.

तत्कालीन मिंधे सरकारच्या काळात भ्रष्टाचारामुळेच सर्व कामे निकृष्ट झाल्याने आता मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र पालिकेकडून किती ठिकाणी आणि किती पंप लावले याची माहितीही पालिका देत नसल्याचेही ते म्हणाले. वरळीत पाणी तुंबले. विमानतळावरही पाणी तुंबले. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्येही पाणी तुंबल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. मिंध्यांमुळेच ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या सर्व रहिवाशांना मिंध्यांनी स्वतःच्या खिशातील पैशाने मदत करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

नगर विकास विभाग असलेले तत्कालीन मुख्यमंत्री फेकनाथ मिंधेंच्या काळात भ्रष्टाचाराचे पैसे त्यांच्या घरात पोहोचले. तेच फेकनाथ आता स्वतःला इन्फ्रामॅन समजून पुस्तके लिहिताहेत. मात्र त्यांनी मुंबईचे हाल पाहावेत, कारण त्यांनी मुंबई तुंबवून दाखवली आहे. ईडीच्या भीतीमुळेच ते भाजपसोबत गेलेत.

तुम्ही वॉर्ड ऑफिसर आहात का…

उपमुख्यमंत्री असलेले शिंदे काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र हे काम करायला तुम्ही वॉर्ड ऑफिसर आहात का, असा सवालही त्यांनी केला. मंत्रालयाने पैसे न खाता काम केले असते तर मुंबईकरांचे हाल झाले नसते, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला. गणेश मंडळांना 15 हजारांचा दंड प्रतिखड्डा जाहीर करता, मग तुमच्यामुळे पडलेल्या खड्डय़ांचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्याचे मुख्यमंत्रीही गेल्या काही वर्षांपासून सत्तेत आहेत. मग असे असताना आजची स्थिती मुंबईत का निर्माण झाली, असा सवालही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;