मधमाशांमुळे इंडिगोचे विमान तासभर लटकले, विमानतळ कर्मचाऱ्यांनी पळ काढला; प्रवाशांची धाकधूक वाढली

मधमाशांमुळे इंडिगोचे विमान तासभर लटकले, विमानतळ कर्मचाऱ्यांनी पळ काढला; प्रवाशांची धाकधूक वाढली

इंडिगोचे विमान क्रमांक ए320 सोमवारी दुपारी 4.20 वाजता सुरतहून जयपूरला जाणार होते. सर्व प्रवासी विमानात चढले होते. त्यांचे सामान भरले जात असताना हजारो मधमाशा विमानाच्या सामानाच्या गेटवर येऊन बसल्या. मधमाशांपासून स्वतःला वाचवण्यासाठी विमानतळ कर्मचारी पळून गेले. सर्वांना वाटले होते की मधमाशा स्वतःहून उडून जातील, पण तसे झाले नाही. यानंतर, त्यांना हाकलण्यासाठी धुराचा वापर करण्यात आला. त्याचाही काही उपयोग झाला नाही.

अग्निशमन दलालाही सूचना देण्यात आली. यानंतर, पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा वापर करून मधमाशा हटवण्यात आल्या. यामुळे विमान सुमारे एक तास विमानतळावर अडकून पडले. परिस्थिती सामान्य झाल्यावर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. जयपूरला विमान तासाभराच्या विलंबाने पोचले.

मधमाशांनी हल्ला केला तेव्हा प्रवासी विमानात बसले होते आणि त्यांचे लगेज ठेवले गेले होते. परंतु मधमाशांचा थवा उघड्या दरवाजावर जाऊन बसला. त्यानंतर त्यास हटविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मधमाशाचा डंख खूपच तीव्र वेदना देणारा असून त्याने सूजही येते. हा दंश एक ते दोन दिवसांनी बरा होतो. काही लोकांना मधमाशांनी गंभीर अलर्जी होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी क्रीडा विधेयकाचा अभ्यास, नंतरच प्रतिक्रिया; राजीव शुक्ला यांची सावध भूमिका आधी क्रीडा विधेयकाचा अभ्यास, नंतरच प्रतिक्रिया; राजीव शुक्ला यांची सावध भूमिका
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सावध भूमिका घेतली. विधेयकावर कोणतीही स्पष्ट...
पुण्याच्या श्रेयसी जोशीने रचला इतिहास!
नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे
दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम
‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा खाताय जास्त मीठ, ताबोडतोब प्रमाण करा कमी
दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
हिंदुस्थान 5 वर्षांनी पुन्हा चिनी पर्यटकांना देणार व्हिसा देणार, 24 जुलैपासून करता येईल अर्ज