वसईत दोन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा डाव फसला; बोगस तृतीयपंथियांना नागरिकांनी चोपले

शाळेतून चालत घरी जात असलेल्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज बोगस तृतीयपंथियांनी केला. मात्र दक्ष नागरिकांनी त्यांना बेदम चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपहरणाच्या कटात सहभागी असलेल्या रिक्षाचालकासह तिनही बोगस तृतीयपंथियांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मुलींच्या अपहरणाचा डाव फसला असला तरी विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसईच्या खोचिवडे गावातील दोन शाळकरी मुली मूळगाव खारेकुरण येथून चालत घरी जात होत्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला एका रिक्षामध्ये दबा धरून बसलेल्या तृतीयपंथियांनी मुलींना घेरले आणि त्यांना जबरदस्तीने पकडले. तसेच या मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलींनी न डगमगता मोठ्याने बचाव बचाव, असा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने परिसरातील दक्ष नागरिकांनी तत्काळ धाव घेतली.

मुलींच्या आवाजामुळे धावून आलेल्या नागरिकांनी तत्काळ तृतीयपंथियांना पकडले आणि त्यांना बेदम चोपले. रिक्षाचालक सूरज मातोल यालाही जाब विचारून बदडले. पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शरद शिंदे, संजय गोलनकर, नीलेश मांडवकर हे बोगस तृतीयपंथी व रिक्षाचालक सूरज मातोल या सर्वांना तत्काळ अटक केली. हे सर्वजण कळव्याचे रहिवासी आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालक व तृतीयपंथीय टेहळणी करीत होते, असे दिसून आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs ENG 4th Test –  ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता IND vs ENG 4th Test – ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. दिवसाअखेर टीम इंडियाने चार गड्यांच्या मोबदल्यात 264 धावा...
दौंडमध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, 36 तासांनंतर चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल
IND Vs ENG 4th Test – यशस्वी जयस्वालची ओल्ड ट्रॅफर्डवर ऐतिहासिक खेळी, तब्बल 50 वर्षांनी ठोकलं पहिलं अर्धशतक
राजीनामा दिल्यानंतर लगेच सामानाची बांधाबांध, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपती भवन रिकामं करणार
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसतात ही लक्षणे, कशी ओळखावी? वाचू शकतो जीव
नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर