मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ का काढू दिला नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले…

मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ का काढू दिला नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले…

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी सकाळी निघणाऱ्या ‘मराठी मोर्चा’ला परवानगी नाकारण्यात आली. प्रचंड राजकीय दबावाखाली असलेल्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत दडपशाही केली. पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची, मराठी प्रेमींची धरपकड सुरू केली. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मराठी माणसाने मराठीसाठी महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही तर कुठे काढायचा? परप्रांतीयांना मोर्चा काढू देता, मग मराठी माणसावर दादागिरी का? असा सवाल उपस्थित झाला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून मोर्चा का काढू दिला नाही हे स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी मीरा-भाईंदर येथील ‘मराठी मोर्चा’बाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, कुणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण देतो. मीरा-भाईंदर येथील मोर्चाच्या मार्गा संदर्भात चर्चा सुरू होती असे मला आयुक्तांनी सांगितले. पण ते जाणीपूर्वक अशा प्रकारचा मार्ग मोर्चासाठी मागत होते ज्यातून कुठेतरी संघर्ष होईल. तसेच काही लोकांच्या संदर्भात पोलिसांना इनपुट मिळाले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी एवढेच सांगितले की जो नेहमी मोर्चाचा मार्ग असतो तो वापरा. पण त्यांनी नकार दिला आणि याच मार्गावरून मोर्चा काढणार असे म्हटले. त्यामुळे परवानगी नाकारली.

मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यात कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर आपण परवानगी देतो. पण आम्हाला इथेच काढायचा आहे, असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. सगळ्यांना एकत्र रहायचे आहे. राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य मार्ग देऊन परवानगी मागितली तर कधीही परवानगी देऊ, असेही फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनात ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच पीक विम्यासाठी...
वाढदिवसानिमित्त देवाभाऊंवर कौतुकवर्षाव; संधी आहे, फडणवीस दिल्लीत जातील, उद्धव ठाकरे, पवार यांच्याकडून शुभेच्छा!
आईच्या नावाने बार काढता, बायका नाचवता, लाज वाटत नाही काय? अनिल परब यांचा जोरदार हल्ला
गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास 15 हजार दंड, पालिकेच्या नियमांचे विघ्न
‘अविश्वासा’मुळेच धनखड यांचा राजीनामा, एक कॉल आला आणि तडकाफडकी निर्णय, न्या. वर्मा यांच्याविरुद्धच्या ठरावाने ठिणगी पडली
संतापजनक घटना… पोटात लाथा घातल्या, केस पकडून उचलून आपटले; कल्याणमध्ये मराठी स्वागतिकेला परप्रांतीय तरुणाकडून अमानुष मारहाण
साखळी बॉम्बस्फोट; राज्य सरकार सुप्रीम कोर्टात, आरोपींच्या सुटकेला आव्हान