‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावे, असे म्हटले आहे, ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे. त्याचे ट्रॅकींग केले जात आहे. कोणीही पाकिस्तानी नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडला नाही. त्याची आकडेवारी लवकरच तुम्हाला दिला जाईल. परंतु सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे. त्या लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावा की अन्य काही, हे सांगण्यास माझ्याकडे शब्द नाही. त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या लोकाबद्दल संवेदना नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अडीच वर्ष बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले होते. त्यामुळे आपण अडीच वर्ष मागे गेलो. या दरम्यान गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात खूप पुढे निघून गेला. आमचे सरकार आल्यानंतर हे काम आम्ही पुढे नेले. आता खूप चांगले काम झाले आहे. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होईल.

ईडी इमारतीस लागलेल्या आगीत प्रत्येक पेपर सुरक्षित आहे. या आगीमुळे कोणत्याही कागदाला धक्का लागला नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच...
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू