Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती

Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुखावला गेला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. पण असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे देशाच्या जनतेला हवी आहेत. कश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतानाही सुरक्षेत अशी चूक का झाली? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप आणि आक्रोश आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर हिदुस्थानने पाकिस्तान विरुद्ध कारवाई करत अनेक ठोस पावलं उचलली आहेत. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. पण असे काही प्रश्नं आहेत ज्यांची उत्तरे देशातील जनतेला हवी आहेत. काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतानाही सुरक्षेत अशी चूक का झाली? लष्कर आणि सीमा थेट मोदी सरकारच्या अखत्यारीत येतात, तरीही दहशतवादी सीमावर्ती भागात इतक्या आत कसे घुसले? इन्टेलिजन्सने एवढी मोठी चूक कशी केली? अशी प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने विचारले हे 6 प्रश्न…

1. सुरक्षेत चूक कशी झाली?
2. गुप्तचर यंत्रणा कशी अपयशी ठरली?
3. दहशतवादी सीमेवरून कसे घुसले?
4. 26 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे?
5. गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का?
6. या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेणार का?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;