सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकूने हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने आज वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असून सुटका करण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे.

आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या शरीफुल याने एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी त्याने हा अर्ज मागे घेत वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला. आपल्याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे, आपली अटक बेकायदा ठरवावी आणि आपल्या सुटकेचे आदेश द्यावेत, अशी मागणी शरीफुल याने या दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन त्यावर पोलिसांना 13 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरीफुल याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात