नालेसफाईत दिरंगाई केली तर बिले मंजूर करणार नाही, केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचा ठेकेदारांना इशारा

नालेसफाईत दिरंगाई केली तर बिले मंजूर करणार नाही, केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचा ठेकेदारांना इशारा

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात सुरू असलेल्या नाल्याची आणि गटारांची सफाई कामे 31 मेपूर्वी पूर्ण करा असे सांगतानाच ही कामे निविदेतील अटी-शर्तीचे पालन न करता केली तर बिले मंजूर करणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी ठेकेदारांना दिला.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची योग्य सफाई व्हावी यासाठी आयुक्त गोयल स्वतः स्पॉट व्हिजीट करत आहेत. त्यांनी ‘जे’, ‘आय’, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभागातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवंगुळ, ‘ह’ प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप उपस्थित होते.

गाळ, कचरा दोन दिवसांत उचला !
नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा सुकल्यानंतर दोन ते तीन दिवसांत उचला अशा सक्त सूचना आयुक्त गोयल यांनी ठेकेदारांना दिल्या. साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करा आणि कामाला गती द्या, असे सांगतानाच शहरात फिरून पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचे त्यांनी ठेकेदारांना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
22 एप्रिल ही अशी तारीख आहे की या दिवसाने संपूर्ण भारताला हादरवलं. या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला,...
मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन
‘ओ दीदी…अब काम मांगने मत आना…’ भारताविरोधात बोलणाऱ्या माहिरा खानवर भडकला अभिनेता
पाकिस्तानसाठी मृत्यूची घंटा झालेली रवीना टंडन, माजी पंतप्रधानांची उडालेली झोप, कारण समोर
पंजाब आणि जम्मूमधील अनेक रेल्वे रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाचा निर्णय
…पण कोणीही दहशतवाद पोसू नये, ‘तारक मेहता…’ फेम बबिताजींनी पाकला सुनावलं; हिंदुस्थानच्या जवानांना केला सॅल्यूट
India Pakistan War – बातम्या दाखवताना सायरनचा आवाज वापरू नका, केंद्रीय गृहमंत्रालयाचे न्यूज चॅनेल्सना सूचना