इंदूर ठरले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर, महिला बालकल्याण विभागाची माहिती

इंदूर ठरले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर, महिला बालकल्याण विभागाची माहिती

इंदूर शहर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे. एकेकाळी इंदोरच्या रस्त्यांवर पाच हजार भिकारी होते. आता मात्र इंदोर पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे. तेथील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी तेथील प्रशासनाने एक कॅम्पेन राबवले. तेथील भिकाऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या तसेच भीक मागणाऱ्या लहान मुलांना शाळेत पाठवण्यात आले. पाच हजार भिकाऱ्यांपैकी पाचशे लहान मुले होती. केंद्र सरकार तसेच जागतिक बँकेने या प्रकल्पाला मदत केली असून या कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली तर अनेक भिकारी हे राजस्थान येथून इंदूरमध्ये आल्याचेही त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर भीक मागणे व भीक देणे किंवा त्यांच्याकडून काही खरेदी करणे यावर शहरात बंदी घालण्यात आली असून तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. भिकाऱ्याबाबत जो कोणी माहिती देईल त्याला एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आल्याने लोकांनी या कॅम्पेनला चांगला प्रतिसाद दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला संताप SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला संताप
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याच्या (BLO) आत्महत्येने राजकीय वातावरण तापले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर...
Nanded News – सरकारी कर्मचाऱ्याकडून आईचा प्रचार, कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्या विरोधात आयोगात तक्रार
विकास आणि निष्ठा हे शब्द राजकारण्यांनी बदनाम केले – डॉ.राजन गवस
श्रीनगरमधील बटमालूमध्ये एसआयएचा छापा, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक
उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ