एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सामूहीक दांडी मारणं पडलं भारी, 25 कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सामूहीक दांडी मारणं पडलं भारी, 25 कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

विमान कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत सामूहिक दांडी मारल्यामुळे ऐनवेळी एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. आता विमान कंपनीने त्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना टर्मिनेशन लेटर दिले आहे. कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाठवण्यात आलेल्या टर्मिनेशन लेटरनुसार एअरलाइन्सने  एकाच वेळी एवढे कर्मचारी आजारी पडणे म्हणजे जाणीवपूर्वक घेतलेली सामूहीक दांडी असल्याचे अधोरेखित करत ही कारवाई केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे टर्मिनेशन लेटरवर स्पष्ट लिहीले आहे की, कामाच्या बरोबर काही वेळेआधी आजारी पडणं याचा अर्थ क्रू मेंबर्स जाणिवपूर्वक फ्लाईट ऑपरेशनमध्ये बाधा आणली. जे कायदा आणि नियमांच्या विरोधात आहे. याशिवाय, क्रू मेंबर्सनी एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड कर्मचारी सेवा नियमांचेही उल्लंघन केले आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ आलोक सिंग यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्रीपासून 100 हून अधिक केबिन क्रू सदस्य त्यांच्या नियोजित फ्लाइट ड्युटीच्या आधी आजारी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे 90 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टाटा समूहाच्या एअर इंडियाच्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स या दोन सहाय्यक कंपन्या आहेत. कमी किमतीची विमानसेवा तयार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरणही सुरू आहे.या प्रकरणी मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार,
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रू मेंबर्सचा आरोप आहे की एआयएक्स कनेक्टच्या क्रू मेंबर्सच्या तुलनेत त्यांच्याशी अत्यंत असमान वागणूक दिली जात आहे. ज्याची तक्रार त्यांनी टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना एक पत्र लिहून केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Loksabha Election 2024 : भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले
जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी वर्तवलं होतं ‘हे’ भविष्य
दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Lok sabha Elections 2024: मुंबईतील 37 मशीदमधून फतवे, शिवसेना आक्रमक, पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Raj Thackeray : ‘तेच ते आपलं घीसापीटा वाक्य’, मतदानानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय? Video
मतदान होण्यापूर्वी कंगना राणावतने सांगितला फ्यूचर प्लॅन, जाहीर केल्या दोन महत्वाकांक्षा