जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी वर्तवलं होतं ‘हे’ भविष्य

जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी वर्तवलं होतं ‘हे’ भविष्य

अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान हे प्रत्येक वेळी त्यांच्या मुलाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. सलमान जेव्हा कधी वादाच्या भोवऱ्यात अडकला, तेव्हा त्यांनी त्याची साथ दिली. यासाठी त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र सलमानलाही त्याची चूक समजावी आणि त्याने त्यासाठी माफी मागावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. असाच एक वाद सलमान आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्यात झाला होता. एका पार्टीदरम्यान सलमानने सुभाष घई यांच्या कानाखाली मारलं होतं.

“भांडणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी चहा पित होतो, तेव्हा सलमान माझ्याजवळ आला आणि त्याने मला घडलेल्या घटनेविषयी सांगितलं. मी त्याला विचारलं की त्याला चूक समजली का? तेव्हा सलमानने त्याच्या चुकीची कबुली दिली आणि दारुमुळे भांडण झाल्याचं सांगितलं. मी त्याला लगेचच सुभाष घई यांना कॉल करून माफी मागण्याचा सल्ला दिला होता आणि त्याने तसंच केलं”, असं सलीम खान यांनी ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद तर अनेकांनाच माहित आहे. 2003 मध्ये विवेकने सलमानविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी तो सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला डेट करत होता. या पत्रकार परिषदेत त्याने सलमानवर बरेच आरोप केले होते. याविषयी सलीम खान एका मुलाखतीत म्हणाले होते, “भावनिक समस्यांसाठी कोणतंच तार्किक किंवा तर्कशुद्ध उपाय नसतो. विवेक आणि सलमान हे दोघं भावनिक आहेत. पुढे काही वर्षांनंतर त्यांना त्यांची चूक समजेल आणि क्षुल्लक गोष्टीवर आपण भांडलो असं वाटेल.”

2009 च्या आधी सलमानच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत होत्या. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत हेत आणि दुसरीकडे तो विविध केसेसमध्येही अडकत होता. सलीम खान हे ज्योतिषीसुद्धा आहेत. त्यावेळी त्यांनी असं भविष्य वर्तवलं होतं की 2009 नंतर सलमानचं आयुष्य बदलेल. “तो सध्या ज्या समस्यांमध्ये अडकला आहे, त्यातून तो लवकरच बाहेर येईल. 2009 पासून त्याचं आयुष्य चांगल्याप्रकारे बदलेल. जर सलमानला लग्न करायचं असेल तर ते या एक-दोन वर्षांत होऊ शकेल, अन्यथा पुढे काही सांगता येत नाही”, असं ते म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;