स्वच्छता विभागात सावळागोंधळ; मग घरफाळा कसा मागता? नागरिकांचा कोल्हापूर महापालिकेला सवाल

स्वच्छता विभागात सावळागोंधळ; मग घरफाळा कसा मागता? नागरिकांचा कोल्हापूर महापालिकेला सवाल

महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाहनांचा तुटवडा पाहाता गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक व त्यांची उपसमिती त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरली आहे. या विभागात सावळा गोंधळ सुरू आहे, त्यामुळे घरफाळा कसा काय मागता, असा सवाल करत, या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन आणि कोल्हापूर शहर तीन आसनी प्रवासी रिक्षा संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व सर्व घटकांना एकत्रित करून महापालिकेने यावरची आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा ‘असहकार आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर शहराच्या 81 वॉर्डांत सुमारे 1 लाख 70 हजार मिळकती, 6.5 कि.मी.चे रस्ते आणि सुमारे 9 ते 10 लाख लोकसंख्या आहे. रस्ते, गटारी, फुटपाथ यांची दैनंदिन साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचा स्वतंत्र सॅनिटरी विभाग आहे.

कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा विभाग दरवर्षी करदात्यांकडून जनरल टॅक्स, सफाईकर यांसारख्या करांच्या नावावर घरफाळा गोळा करते. महापालिका करदात्यांकडून घरफाळा वसूल करत असेल, तर सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन हा विभाग मनुष्यबळ व यंत्रणा यांनी परिपूर्ण असला पाहिजे. मात्र, या विभागात सावळा गोंधळ सुरू असून, स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी...
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त