मारकुट्या शिक्षकाच्या दहशतीला घाबरून विद्यार्थी जंगलात लपून बसले, जव्हारच्या शाळेतील धक्कादायक घटना

मारकुट्या शिक्षकाच्या दहशतीला घाबरून विद्यार्थी जंगलात लपून बसले, जव्हारच्या शाळेतील धक्कादायक घटना

जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांवर निर्माण केलेल्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या छळाची ही कर्म कहाणी कळताच पालकांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली

14 नोव्हेंबर रोजी शिक्षक लोकनाथ जाधव यांनी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले, दूर अंतर असल्याने या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला. इतका उशीर का झाला असा आरडाओरडा करत या शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच उर्वरित विद्यार्थी आपला जीव वाचवत बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून शाळेच्या अंगणात उभे करणे. कानाखाली मारणे. शिकवण्याऐवजी मोबाईलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी सरळ गैरहजेरी… या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ उद्भवली आहे.

शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून येथील पट संख्या 96 आहे. शाळेची नियमित वेळ ही 10.30 ची आहे पण शिक्षक महोदय 11.30 ला हजेरी लावतात, असा पालकांचा आरोप होत असून निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना देखील गावकऱ्यांमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा आहे की, “या शिक्षकाच्या पाठीशी कोण? एवढा उर्मटपणा कोणामुळे?” यांना वरदहस्त कुणाचा असे नाना प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत. अखेर या तक्रारींची दखल घेत ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कमिटी, पालक आणि विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेत भोरे यांनी शिक्षण विभागाला थेट सवाल करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जांभूळ माथा शाळेतील शिक्षकाच्या वर्तुणुकीबाबत समजले आहे. संबंधित विभागाला या प्रकरणाची शहानिशा करून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
– मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्ताने दिला पाच बछड्यांना जन्म हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्ताने दिला पाच बछड्यांना जन्म
हिंदुस्थानात जन्माला आलेल्या मुखी या मादी चित्ताने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यात मुखीने बाळांना जन्म दिला....
चिप्स खाल्यानंतर काही वेळात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं?
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध, नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर
Video – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा कार्यक्रम, उद्धव ठाकरे यांचे संबोधन
Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना, रॅम्पवॉक करताना मिस जमैका स्टेजवरून पडली, रुग्णालयात दाखल
लढाऊ विमानांच्या संदर्भात रशियाचा हिंदुस्थानला नवा प्रस्ताव, अटीशर्तींचा देखील अडथळा नाही
‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री गप्प का? रोहित पवार यांचा सवाल