कोलवडे येथे डम्पिंग ग्राऊंड नकोच, उपजिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

कोलवडे येथे डम्पिंग ग्राऊंड नकोच, उपजिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

ताराबाई परिसरात रोज निर्माण होणारा हजारो टन कचरा टाकण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कोलवडे गावाजवळ खासगी जागा विकत घेणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात जाऊन जागेची पाहणी केली. मात्र ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेताच हा प्रकल्प माथी मारला जात असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत डम्पिंग ग्राऊंडला विरोध केला.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामुळे बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, खैरापाडा, बेटेगाव, मान या गावांत झपाट्याने नागरीकरण वाढले असून दररोज सुमारे 50 ते 60 टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

… अन्यथा आंदोलन करू

संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तारापूर परिसरात शासकीय जागा उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रशासनाने कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील खासगी जागा खरेदीचा प्रस्ताव जवळपास अंतिम केला आहे. पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली. मात्र या पाहणीवेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली. ग्रामपंचायत आणि नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी...
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त