सरन्यायाधीशांवर बूटफेकीचा प्रयत्न, चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरन्यायाधीशांवर बूटफेकीचा प्रयत्न, चर्मकार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भरन्यायालयात जोडा फेकण्याचा संतापजनक प्रयत्न गेल्या 6 ऑक्टोबर रोजी घडल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय चर्मकार समाजाने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकारामागे असलेले षड्यंत्र केंद्र सरकारने उघड करावे आणि यातील आरोपी वकील राकेश तिवारी याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ आदी घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच तेथे बॅरिकेड्स लावून हा मोर्चा खेरवाडी पोलिसांनी अडविला. बूटफेकीच्या हल्ल्याअगोदर राकेश तिवारीला कोण कोण भेटले, त्याला हल्ल्यापूर्वी कोणी कोणी फोन केले याची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी मोर्चाप्रसंगी केली. बुद्धिमत्तेच्या जोरावर भूषण गवई सरन्यायाधीश झाले. याचा रास्त अभिमान चर्मकार समाजाला आहे. त्यांच्याबाबत अशा प्रकारे अवमानजनक कृत्य केले असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबईचे माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे, विद्यमान अध्यक्ष विलास गोरेगावकर, मुंबई महिला अध्यक्षा शारदा नवले, उपनगर अध्यक्ष अशोक देहेरे, दिलीप शिंदे, गणेश खिलारी, अमर शिंदे, राजीव सूर्यवंशी, धामापूरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका
सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे फार्स आणि तमाशा असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली....
पाकिस्तानातून होणारा आर्थिक लाभ आणि अहंकारामुळे हिंदुस्थानशी संबंध बिघडले; अमेरिकेच्या माजी राजदूताचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
फुले स्मारक विस्तारीकरण प्रकल्पात खोडा, बाधितांच्या पुनर्वसनावरून महापालिकेची कोंडी
भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले
बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामाला ग्रीन सिग्नल, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय, केंद्राला प्रस्ताव पाठविणार; उच्चस्तरीय बैठकीत चर्चा
Chandrapur News – शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका