मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बिबट्यांचे मनुष्यांवर हल्ले रोखण्यासाठी 125 बिबट्यांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाईल असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, मानव-बिबट्या संघर्षाबाबत एक बैठक घेण्यात आली. प्रभावित लोकांना 31 ऑक्टोबरपर्यंत मदत पुरविण्यात येईल. बिबट्यांचे निर्बीजकरण (स्टेरिलायझेशन) केले जाईल. सुमारे 125 बिबट्यांना एका ठिकाणी ठेवण्यात येईल आणि काहींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात येईल. नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील… सध्या बिबटे ऊसाच्या शेतात राहू लागले आहेत, त्यामुळे त्यांचा जंगलाशी संपर्क तुटला आहे. आता ते कुत्रे, मांजरी आणि कोंबड्या पकडतात. या समस्येवर उपाय करण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

8 तास झोपल्यानंतरही थकवा आणि सुस्ती येते का? कारण जाणून घ्या 8 तास झोपल्यानंतरही थकवा आणि सुस्ती येते का? कारण जाणून घ्या
रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांची पूर्ण झोप देखील होत नाही. थकवा आणि सुस्तीचे कारण नेहमीच झोपेची कमतरता आणि विश्रांतीचा अभाव हे...
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती