संकटात धावून येतो, तोच शिवसैनिक; मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी राजन विचारे यांनी दिला मदतीचा हात

संकटात धावून येतो, तोच शिवसैनिक; मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी राजन विचारे यांनी दिला मदतीचा हात

नुकतेच मराठवाड्यात झालेल्या भीषण पावसामुळे मराठवाडा कोलमडला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाले. केवळ पीकच नाही तर, जमिनच खरडून वाहून गेली. त्यामुळे मराठवाडा अतिवृष्टीच्या सावटाखाली आहे. पुरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने इथला शेतकरी आता हताश आणि निराशेच्या गर्तेत आहे. यातच पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे सरसावली आहे. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा मतदारसंघातून सर्व जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख तसेच सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पाठवली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक पाठवण्यात आली आहे.

याचबद्दल बोलताना राजन विचारे म्हणाले आहेत की, “संकटाला धावून येतो, तोच शिवसैनिक. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर जेही संकट आलं असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल, अशावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीच शिवसैनिकांना सांगत असतात की, अशावेळी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. ही मदत नाही तर कर्तव्य म्हणून ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदरमधील शिवसैनिकांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक मदत म्हणून पाठवेल आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?