Sangameshwar News – सततच्या पावसाने भात पिक धोक्यात

Sangameshwar News –  सततच्या पावसाने भात पिक धोक्यात

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तयार भात शेती धोक्यात आली आहे. गणपती नंतर खर तर हळवी भात शेती कापण्यायोग्य झाली होती.गणपती उत्सवानंतर वातावरणात देखील बदल पाहायला मिळत होता.परंतु अगदी पुढच्या चारच दिवसात पुन्हा संततधार सुरु झाल्याने तयार भात शेती पावसात भिजत पडली आहे.

गेले पाच महिने बरसणाऱ्या पावसाने,भात कापणीवेळी देखील ठिय्या मांडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.सतत च्या वाढत्या पावसामुळे ओढ्यानसह,नद्यांच्या पाणी पात्रात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.भात शेतीत पाणी तुंबले आहे.जराही उघडीप मिळत नसल्याने भात कापणी कशी करायची या चिंतेत सध्या शेतकरी वर्ग पडला आहे.

यातच भातशेती तयार असल्याने,रात्रीचे वेळी डुक्करांकडून भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे.भाताच्या लोंबी खाऊन,शेतात लोळून भात शेती जमीन दोस्त झालेली पाहायला मिळत आहे.संगमेश्वर तालुक्यात् बहुतांश शेती ही डोंगराळ भागात असल्याने, डुक्करांकडून शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण हे मोठे आहे.असाच पाऊस काही दिवस बरसत राहिला तर हळव्या पिका पाठोपाठ उशिरा तयार होणारी,महान भात शेती देखील संकटात येण्याची चिन्ह आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?