Bihar election 2025 – प्रशांत किशोर  यांची निवडणूक रिंगणातून माघार

Bihar election 2025 – प्रशांत किशोर  यांची निवडणूक रिंगणातून माघार

बिहारमधील जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. पक्ष बांधणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी मागील वर्षी जन सुराज्य पक्षाची स्थापना केली. बिहारमध्ये सुशासन आणणे हे त्यांच्या पक्षाचे ध्येय आहे. हा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. प्रशांत किशोर हे स्वतः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात राघोपूर मतदारसंघातून शड्डू ठोकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज त्यांनी अचानक माघार घेतली. हा पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेजस्वी यादव यांचा अर्ज दाखल

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैशाली जिह्यातील राघोपूर मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका
सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे फार्स आणि तमाशा असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली....
पाकिस्तानातून होणारा आर्थिक लाभ आणि अहंकारामुळे हिंदुस्थानशी संबंध बिघडले; अमेरिकेच्या माजी राजदूताचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
फुले स्मारक विस्तारीकरण प्रकल्पात खोडा, बाधितांच्या पुनर्वसनावरून महापालिकेची कोंडी
भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले
बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामाला ग्रीन सिग्नल, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय, केंद्राला प्रस्ताव पाठविणार; उच्चस्तरीय बैठकीत चर्चा
Chandrapur News – शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका