Chandrapur News – शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका

Chandrapur News –  शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले. वरोरा तालुक्यातील लोधीखेडा गावातील शेतकरी प्रमोद मुंजारे यांनी काढणीस आलेले अडीच एकर मधील सोयाबीन पीक शेतात पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना घडली.

सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या शिवाय येलो मोजॅक, मूळ कूज सारख्या रोगाच्या सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होऊन पीक पूर्णपणे करपले. सोयाबीन सोंगल्याचा खर्च केल्यानंतर पिकात शेंगाच नसल्याने काढणीचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाला आग लावून जाळून टाकत आहे. दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने वरोरा तालुक्यात नापिकेने आत्महत्या सुद्धा केल्याची घटना घडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? ही एक जीवघेणी स्थिती…लक्षणे आणि उपाय काय आहेत? सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? ही एक जीवघेणी स्थिती…लक्षणे आणि उपाय काय आहेत?
हार्ट अटॅक ही एक जीवघेणी आरोग्य स्थिती आहे. कारण कधी आणि कोणत्या कारणांनी हार्ट अटॅक येईल काही सांगता येत नाही....
चंद्रपुरात 69 व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली, दीक्षाभूमीवर उसळला धम्मसागर
Video – राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार ठाणे महानगरपालिकेत
Bhandara accident – स्कूल व्हॅन पलटून 10 विद्यार्थी जखमी, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात
Video – ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराविरूद्ध राजन विचारे आक्रमक
Photo – ‘कुछ कुछ होता है’ला 27 वर्ष पूर्ण, करण जोहरनं शेअर केले सेटवरील खास फोटो
राजस्थानमध्ये आणखी एक दुर्घटना, कार-ट्रेलरची धडक बसून चार मित्रांचा होरपळून मृत्यू