पेंट, शाईतील विष कफ सिरपमध्ये? लिमिटपेक्षाही अधिक मात्रेत; का?, धक्कादायक रिपोर्ट

पेंट, शाईतील विष कफ सिरपमध्ये? लिमिटपेक्षाही अधिक मात्रेत; का?, धक्कादायक रिपोर्ट

कफ सिरप पिल्ल्याने मुलांचे मृत्यू होत असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. आतापर्यंत तब्बल 16 मुलांचे मृत्यू कफ सिरप पिल्याने झाली. तामिळनाडू ड्रग कंट्रोल विभागाच्या अहवालात असे म्हटले आहे की, मुलांना देण्यात येणाऱ्या कोल्ड सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल होते. अनेक राज्यांनी थेट निर्णय घेत आपल्या राज्यात कफ सिरपवर थेट बंदी घातली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये कफ सिरपवर पूर्णपणे बंदी आहे. रिपोर्टनुसार, मध्य प्रदेश ड्रग कंट्रोलरने केलेल्या तपासणीत असेही आढळून आले आहे की, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) 48 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलीची परवानगी फक्त 0.1 टक्के आहे.

कफ सिरपमध्ये मिसळलेला ब्रेक फ्लुइड्स, पेंट्स, शाई इत्यादींच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. यापूर्वी अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेने देखील वारंवार इशारा दिला आहे की, औषधांमध्ये त्याचा वापर आरोग्यासाठी खूप जास्त धोकादायक आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचा कफ सिरपबद्दलचा दावा खरा होताना दिसतोय. देशातील तब्बल 16 मुले या कफ सिरपमुळे मृत्यूमुखी पडली आहेत.

डायथिलीन ग्लायकॉल हे रंगहीन आणि गंधहीन अल्कोहोलिक आहे. ते रेझिन, प्लास्टिसायझर्स, ब्रेक फ्लुइड्स, लोशन, क्रीम, डिओडोरंट्स इत्यादींमध्ये वापरले जाते. ओलावा टिकवण्यासाठी त्याचा वापर होतो. अनुप्रयोगांमध्ये विरघळणारे पदार्थ म्हणून वापरले जाते. थोडक्यात काय तर हे एखाद्या विषाप्रमाणे काम करते आणि याला खाद्यपदार्थांपासून दूर ठेवले गेले पाहिजे. हेच कफ सिरपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातंय.

प्रति किलोग्रॅम फक्त 1 ते 2 मिलीलीटर इथिलीन ग्लायकॉल मानवांसाठी घातक ठरू शकते. भारतात काही मोजक्या औषधांमध्ये याला फक्त आणि फक्त 0.01 टक्के वापरण्याची परवानगी आहे. काही देशांमध्ये तर याच्यावर बंदी असून कोणत्याही औषधांमध्ये हे वापरले जाऊ शकत नाही. कंपन्यांनी त्यांच्या पैसा वाचवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि थेट यामुळे लेकरांची जीव जात आहेत.

डायथिलीन ग्लायकॉल हा एक अत्यंत विषारी पदार्थ आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम थेट आपल्या किडनीवर होतो. जे मूत्रपिंडाच्या पेशी नष्ट करतात. मुळात म्हणजे असे अजिबात नाही की, डायथिलीन ग्लायकॉल औषधांमध्ये टाकलेच पाहिजे. त्याच्या मदतीशिवाय देखील औषध तयार होते. पण कंपन्या आपल्या स्वार्थासाठी आणि पैसा वाचव्यासाठी त्याचा सर्रासपणे वापर करतात. आता अशा कंपन्यांवर सरकार काय कारवाई करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली; ऐन दिवाळीत GRAP-2 लागू दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली; ऐन दिवाळीत GRAP-2 लागू
ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यात GRAP 2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक...
हवेत असताना केबिनमध्ये आग, चीनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुखरुप
चेन्नईत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत
तेलंगणामध्ये आमदार होण्यासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २१ होणार, सरकार विधानसभेत मांडणार प्रस्ताव
6 महिन्यांनंतर त्याचा आवाज परत मिळाला, डॉक्टरांनी केली दुर्लभ लॅरिंजियल रि- इनर्वेशन सर्जरी
स्वयंपाक करताना कोणते तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले? तुम्ही पण हेच वापरता का?
तुम्हीही सतत नखे खाता का? अत्ताच सोडा ही सवय अन्यथा हा आजार होण्याचा धोका