‘गँग्स ऑफ गद्दार’ला झटका, संजय शिरसाट यांच्या पाच हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याची मुख्य सचिवांकडून चौकशी होणार

‘गँग्स ऑफ गद्दार’ला झटका, संजय शिरसाट यांच्या पाच हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याची मुख्य सचिवांकडून चौकशी होणार

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोची दीडशे एकर जमीन नवी मुंबईतील एका कुटुंबाला बेकायदेशीररीत्या देऊन पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटी रुपयांची दीडशे एकर जमीन मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत करणाऱया नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. त्या आदेशावर शिरसाट यांची सही आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्या प्रकरणाला रोहित पवार यांनी ‘गँग्स ऑफ गद्दार’ असे नाव दिले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

रोहित पवार यांनी केवळ आरोप न करता पुरावे द्यावेत असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांना 12 हजार पानांचे पुरावे दिल्यानंतरही त्यांनी चौकशी केली नाही असा आरोप रोहित पवार यांनी केला. आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केली. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत असे त्यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय? Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती...
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा
जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला
भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल