देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच केराची टोपली; वगळलेला ‘स्मार्ट’ ठेकेदार 750 कोटींच्या टेंडरला ठरला पात्र, राजकीय वर्तुळात चर्चा

देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच केराची टोपली; वगळलेला ‘स्मार्ट’ ठेकेदार 750 कोटींच्या टेंडरला ठरला पात्र, राजकीय वर्तुळात चर्चा

महायुती सरकारमधील मंत्र्यांचे आणि नेत्यांच्या भ्रष्टाचाराची आणि घोटाळ्यांची रोज नवी प्रकरणे उघड होत आहेत. या मुद्द्यावर राज्याचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. आता देवेद्र फडणवीसांच्या आदेशालाच सामाजिक न्याय विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे उघड झाले आहे. फडणवीसांनी वगळलेल्या ठेकेदारावर मेहनजर करत त्यांच्या कंपनीला 750 कोटीच्या टेंडरसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच्या ‘स्मार्ट’ सर्व्हीसेस (पूर्वीचे नाव ब्रिस्क इंडिया) कंपनीविरुद्ध ईडीची चौकशी सुरू असल्याने कंपनीला सेवा पुरवठादार कंपन्यांच्या पॅनेलमधून वगळण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही मंत्री संजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय विभागाने कंपनीवर भलतीच मेहेनजर केली आहे. कंपनीला तब्बल 750 कोटी रुपयांच्या टेंडरसाठी पात्र ठरवल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे. टेंडरनामाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सामाजिक न्याय विभागाने विभागाच्या अखत्यारीत असलेल्या विविध आस्थापनांमध्ये यांत्रिकी साफसफाई आणि मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी मार्च महिन्यात टेंडर प्रसिद्ध केले आहे. 750 ते 800 कोटी रुपयांच्या या टेंडरसाठी 10 कंपन्यांमधून स्मार्ट सर्व्हिसेस (पूर्वीची ब्रिस्क इंडिया), ‘बीव्हीजी इंडिया’ आणि ‘क्रीस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस’ या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. याच तीन कंपन्यांना विभागून हे टेंडर देण्याचा घाट घातला जात आहे. टेंडरमध्ये यांत्रिकी साफसफाई आणि मनुष्यबळ पुरवठ्यावर नेमका किती खर्च केला जाणार याची नेमकी माहितीच लपवण्यात आली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे हे उल्लंघन आहे. सीव्हीसी सूचनांनुसार टेंडरची एकूण किंमत किती आहे हे स्पष्ट करणे बंधनकारक आहे. या कंपन्यांना 3634 मनुष्यबळ पुरवठा आणि 6 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र कोणत्या पदासाठी किती वेतन दिले जाणार याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे सर्व्हिस चार्जच्या आधारावर शेकडो कोटींचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध टेंडरमध्ये कित्येक वर्षे याच तीन कंपन्या काम करत आहेत. त्यामुळे विभागात या ठेकेदारांचे कार्टेल दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.

एकनाथ शिंदे सरकारच्या काळात राज्य सरकारने 10 सेवा पुरवठादार कंपन्यांचे पॅनेल नियुक्त करण्याची प्रक्रिया केली होती. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळची ‘ब्रिस्क इंडिया’ (‘स्मार्ट सर्व्हिसेस’) कंपनीविरुद्ध ईडीची चौकशी सुरू असल्याने 10 कंपन्यांच्या पॅनेलमधून ‘ब्रिस्क इंडिया’ला वगळण्यात यावे आणि 9 सेवा पुरवठादार कंपन्यांच्या पॅनेललाच मान्यता द्यावी असे निर्देश दिले होते. तरी सुद्धा हे निर्देश डावलून मंत्री संजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय विभागाने ठेकेदार कंपनीवर वरदहस्त ठेवला आहे, याची चर्चा होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वपूर्ण सुरक्षा आदेश जारी केला आहे. सर्व हिंदुस्थानी...
Latur News – तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
बिहारला देशाचे क्राइम कॅपिटल बनले, नीतीश कुमार आणि भाजपवर राहुल गांधींचा हल्लाबोल
Mumbai News – मद्यधुंद अवस्थेत रात्री जुहू बीचवर ड्रायव्हिंग, वाळूत कार अडकली; तिघांवर गुन्हा दाखल
शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे