आंब्याचा ट्रक पिकअपवर उलटला, अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू; 12 जण जखमी

आंब्याचा ट्रक पिकअपवर उलटला, अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू; 12 जण जखमी

चाक रेतीत अडकल्याने आंब्याचा ट्रक पिकअपवर उलटलून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवण्यात आले.

आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातील रेड्डीचेरुवुजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. सदर आंब्याचा ट्रक राजमपेट मंडलातील थल्लापका गावाहून कोडूरला चालला होता. यावेळी मजूर आंब्याच्या पेट्यांवर बसले होते. यादरम्यान रेड्डीपल्ली तलावाच्या बांधावर चढताना ट्रकचे चाक रेतीत अडकले. यामुळे ट्रक पिकअपवर उलटला आणि भीषण अपघात घडला. ट्रक उलटल्याने पेटीवर बसलेले मजूर खाली पडले. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 12 जखमी झाले.

जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडप्पा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पुल्लमपेट पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वपूर्ण सुरक्षा आदेश जारी केला आहे. सर्व हिंदुस्थानी...
Latur News – तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
बिहारला देशाचे क्राइम कॅपिटल बनले, नीतीश कुमार आणि भाजपवर राहुल गांधींचा हल्लाबोल
Mumbai News – मद्यधुंद अवस्थेत रात्री जुहू बीचवर ड्रायव्हिंग, वाळूत कार अडकली; तिघांवर गुन्हा दाखल
शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे