मीठभाकर खाऊन आम्ही सुखी, वाटद एमआयडीसीला जमिनी देणार नाही; सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ठणकावले

मीठभाकर खाऊन आम्ही सुखी, वाटद एमआयडीसीला जमिनी देणार नाही; सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ठणकावले

आम्ही आमच्या शेतीवाडी,आंबा-काजू उत्पन्नात समाधानी आहोत. उद्या सागरी महामार्ग होणार आहे, त्यामुळे पर्यटन वाढणार आहे. अशावेळी आमच्या करोडो रूपयाच्या जमिनी आम्ही एमआयडीसीला कवडीमोल दराने का द्यायच्या? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी एमआयडीसीसाठी भूसंपादनाला विरोध केला. आम्ही मीठभाकर खाऊन सुखी आहोत. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, असे प्रथमेश गवाणकर यांनी वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाच्या सुनावणीत सांगितले.

वाटद एमआयडीसीसाठी जमीन भूसंपादनाकरिता सोमवारी अल्पबचत सभागृहात सुनावणी झाली. या सुनावणीच्यावेळी प्रथमेश गवाणकर यांनी आपले मत मांडले. प्रथमेश गवाणकर म्हणाले की, प्रत्येक ग्रामस्थांना नोटीस देण्यात आली पाहिजे होती. मात्र, तलाठी कार्यालयात येऊन नोटीस घेऊन जा, असे सांगतात, अशी तक्रार केली. या तक्रारीवर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी यापुढे नोटीस तलाठ्यांनी दिली पाहिजे. कुणालाही नोटीस घ्यायला कार्यालयात बोलवू नका. आवश्यक असल्यास कोतवालामार्फत नोटीस पाठवा, अशी सूचना दिली. तसेच कुणाचे घर किंवा धार्मिक स्थळे असलेली जमीन संपादित केली जाणार नाही. कुणाचे घर जात असेल तर त्यांनी कळवावे, आम्ही ते वगळू असे जीवन देसाई यांनी सांगितले.

अतिरिक्त बाराशे एकर कुणासाठी?
वाटद एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक हजार जमीन रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एक हजार एकर रिलायन्स डिफेन्स कंपनीला देणार मग उर्वरित बाराशे एकर जमीन कशाला? असा सवाल गवाणकर यांनी उपस्थित केला.

रोजगाराचे काय?
रोजगार निर्मितीबाबतही प्रथमेश गवाणकर यांनी प्रश्न उपस्थित केला.आज जयगड परिसरात जिंदाल कंपनी,आंग्रे पोर्ट आणि लावगण डॉकयार्ड या कंपन्या आल्या आहेत. स्थानिकांना किती रोजगार मिळाला आहे? उद्या या एमआयडीसीतून स्थानिकांना रोजगार मिळेल का? असा सवाल गवाणकर यांनी व्यक्त केला.सरकारला वाटद एमआयडीसी उभारून स्थानिकांचा विकास करायचा आहे की बाहेरच्या लोकांचा ? असा सवाल उपस्थित करताना स्थानिकांचा विकास करायचा असेल तर शेतीच्या माध्यमातून आमचा विकास करा असा सल्ला गवाणकर यांनी दिला.

अंबानी-अदानी कशाला स्थानिक उद्योगपती घडवा
वाटद येथील शेतकऱ्यांची दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित करत आहात. आमची जमीन कवडीमोलाने विकत घेऊन एमआयडीसी चार पट दराने विकणार असा आरोप गवाणकर यांनी केला. वाटदमधील जमीन अंबानी आणि अदानी यांना देण्यापेक्षा स्थानिक लोकांना जमीन देऊन स्थानिक उद्योगपती निर्माण करा, असे त्यांनी सुचविले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी
अमरनाथ यात्रा मार्गावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला मंगळवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले आहेत....
संगमेश्वर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग…! ठेकेदार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांची मालिका सुरुच
सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ? धनकड यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क सुरू
105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळे संतापल्या
लँडिंग करताच एअर इंडियाच्या विमानाला आग, दिल्लीतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना
कितीही संकटे येवोत, ती परतून लावण्याची ताकद शिवसैनिकांच्या निष्ठेत आहे; बबनराव थोरात यांचा विश्वास
संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब; विरोधकांचा गदारोळ, बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीला विरोध